भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जमनलाल बजाज प्रशासकीय भवनासमोरील मैदानात नमो युवा महासंमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री स्मृती इराणी,युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्यासह मंत्री,आमदार,खासदार भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करण्याचा संकल्प करण्यासाठी विदर्भ आणि महाराष्ट्रातील युवाशक्ती नागपुरात एकत्र आल्याचे पाहून आनंद झाला.’अबकी बार चारसो पार’ हा संकल्प युवांनी नागपूर येथे घेतला आहे.पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले तर भारताला कुठेही मागे वळून पहावे लागणार नाही.पुढच्या 5 वर्षात भारत अशा प्रकारे मजबूत बनेल की भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही.या भारताशी कुणीही मुकाबला करु शकणार नाही.बलशाली भारत घडवण्याची संधी ही तुम्हाला सगळ्यांना मिळाली आहे.त्यामुळे पुढील दीड महिना आपल्या देशासाठी द्यावा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.
भारताला बलशाली बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इंडिया ची सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खाणार नाही आणि खाऊ देणार नाही’ हा मूल मंत्र दिला.यामुळे जे 50 वर्षात झाले नाही ते 10 वर्षात साध्य झाले.भारत आता महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून जी 20 परिषदेच्या माध्यमातून जगाने मोदीजींचे नेतृत्व स्वीकारले आहे.गरीबी हटाव चा नारा इंदिराजीचा असेल पण गरीबी हटावचं काम मोदीजींनी केलं.भारत येत्या काळात भारत जगातली 3 रि सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे.2024 ची निवडणूक भाजपाच्या विजयासाठी नाही तर भारताच्या विजयासाठी असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.